महाराष्ट्र ताज्या बातम्या

दावोस करारांपैकी ₹३.७२ लाख कोटींच्या उद्योग प्रक्रियेला गती – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई – दावोस येथे झालेल्या गुंतवणुकीच्या करारांपैकी ₹३.७२ लाख कोटींच्या उद्योग प्रकल्पांच्या प्रक्रियेला वेग आला असून, मंगळवारी कॅबिनेट उपसमितीने त्यांना प्राथमिक परवानगी दिली. त्यामुळे संबंधित उद्योग प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, “दावोस येथे झालेल्या करारांबाबत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट करतो की, गेल्या तीन वर्षांत आपण दावोसला जात आहोत. या कालावधीत झालेल्या करारांपैकी ६१ टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यातून अंदाजे १.५ ते १.७५ लाख रोजगार निर्माण होईल.”

यंदा ₹१५ लाख कोटींचे करार (एमओयू) करण्यात आले असून, “सरकारचे लक्ष्य ८५ टक्के करारांची अंमलबजावणी करण्याचे आहे. महाराष्ट्र हा एफडीआयमध्ये देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा उल्लेख रिझर्व्ह बँकेच्या अहवालात आहे,” असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

उद्योग धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत अधिक पारदर्शकता ठेवण्यासाठी सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. विदर्भातील गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

“विरोधी पक्ष सदस्य, पत्रकार आणि संबंधित अधिकाऱ्यांसह आपण स्वतः या उद्योग प्रकल्पांच्या स्थळांची पाहणी करण्यास तयार आहोत,” असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा दावा करताना त्यांनी सांगितले की, “मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण आणि दुरुस्तीबाबतही सरकार गांभीर्याने विचार करत आहे. यासंदर्भात आमदारांसह एकत्रित बैठक घेतली जाईल, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहतील.”

“मुंबईतील रस्त्यांमध्ये केवळ ०.४ टक्के भेगा पडल्याचे निदर्शनास आले असून, सरकार या कामांची देखरेख करत आहे,” अशी माहितीही मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात