ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘है तैयार हम ‘ 28 डिसेंबरच्या महारॅलीसाठी नागपूरची ऐतिहासिक भूमी सज्ज

नागपूर

देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही सर्व तयार असून ‘ है तयार हम ‘ रॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरेल असे म्हणत लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन केंद्राच्या दडपशाही धोरणाला उलथवून टाकूया, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

नागपूरमध्ये भारत जोडो मैदानाला भेट देत तयारीचा आढावा घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, सोनिया गांधी यांची लोकशाही वाचविण्यासाठी संविधान बचाव सभा नागपूरात झाली होती त्यामुळे देशात परिवर्तन झाले. आज पुन्हा काँग्रेस पक्षाचा स्थापन दिवस २८ डिसेंबर रोजी नागपूरच्या ऐतिहासिक भूमीत महारॅलीने साजरा केला जात आहे. काँग्रेसचा १३८ वा वर्धापन दिन नागपूरमध्ये होत आहे ही नागपूर व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.

विदर्भाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे त्यामुळे है तैयार हम महारॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरेल.असे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे जी, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी व लाखो काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. ज्या मैदानात हा मेळावा होत आहे त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ अशी या महारॅलीची संकल्पना असून मेळाव्याची सर्व तयारी झाली आहे, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात