महाराष्ट्र ताज्या बातम्या

शहादा एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय; उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय झाला असून, जमीन हस्तांतरणाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. तसेच, सदस्यांच्या मागणीनुसार आणखी एक बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल आणि शहादा एमआयडीसी निश्चितच पूर्णत्वास नेली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राजेश पाडवी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

ते म्हणाले, नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून, तो अद्याप औद्योगिक विकासापासून वंचित आहे. जिल्ह्यात दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण आणि दरडोई उत्पन्न घटणे यांसारख्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ६०% आणि शहादा तालुक्यातील ५३% गावांमधून आदिवासी लोकसंख्या स्थलांतरित झाली आहे, याकडे पाडवी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच, शासनाने यावर कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यावर उत्तर देताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, सामूहिक प्रोत्साहन योजनेत नंदुरबार हा आकांक्षित जिल्हा म्हणून समाविष्ट आहे. येथे येणाऱ्या उद्योगांना विशेष सवलती आणि गुंतवणूक तसेच रोजगारासंदर्भात शिथिल निकष लागू करण्यात आले आहेत. नंदुरबारमध्ये सध्या १,५८६ उद्योग कार्यरत आहेत. स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मौजे टोकरतळे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कार्यालय स्थापन केले जाईल. आदिवासी प्रकल्पांतर्गत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जात आहे. कुपोषण कमी करण्यासाठी राज्य पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

शहादा एमआयडीसी शंभर टक्के प्रत्यक्षात उतरणार असल्याचे मंत्री सामंत यांनी ठामपणे सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात