महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागपूर हिंसाचारप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा; ऑपरेशन मुस्कान आणि सायबर सुरक्षेवर भर – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई – नागपूरमध्ये सोमवारी जाळल्या गेलेल्या प्रतिकात्मक कबरी आधीच तयार नव्हत्या, असे ठामपणे सांगतानाच, ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले, त्यांना कबरीतूनही शोधून काढू आणि अफवा पसरवणाऱ्यांनाही सोडणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरादरम्यान व्यक्त केला.

महिला व बाल सुरक्षा संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत ३८,९१० बेपत्ता मुले-मुली शोधून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या ९९.५८% घटना ओळखीच्या व्यक्तींकडून घडतात, असे त्यांनी स्पष्ट केले. ९०% प्रकरणांमध्ये ६० दिवसांत चार्जशीट दाखल करण्यात आली असून, हे प्रमाण लवकरच १००% करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

महिला तक्रारींसंदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, महिलांची तक्रार महिला अधिकाऱ्यांनीच नोंदवली पाहिजे. तसेच, ११२ हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारींच्या दखल घेण्याच्या गतीमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, लवकरच तेलंगणाला मागे टाकले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निर्भया फंडाच्या वापरासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, २५० कोटी रुपयांपैकी २३५ कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत. महिला अत्याचार प्रकरणांमध्ये २०२४ मध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ५०% होते, ते ७५% करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सायबर गुन्हेगारी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, मार्व्हल कंपनीच्या माध्यमातून AI तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगार शोधण्यासाठी केला जाईल, आणि १० वेगवेगळ्या शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल.

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी २४ तासांच्या आत गुन्हे उघडकीस आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. २०२४ मध्ये ४४० कोटी रुपये सायबर फसवणुकीतून वाचवून तक्रारदारांना परत करण्यात आले.

नवी मुंबईत देशातील सर्वात आधुनिक सायबर महामंडळ उभारण्यात येणार आहे, ज्याची प्रभावीता पाहता दोन परदेशी सरकारांनी या सेवेची मागणी केली आहे, असेही त्यांनी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने बँकांनी सायबर फसवणुकीतील नुकसानभरपाई द्यावी, असा निकाल दिला असल्याने नागरिकांना याचा मोठा फायदा होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात