महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dhananjay Munde : मुंडे यांना अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा; मुंजा गित्ते जमीन खरेदी खटला पुनरुज्जीवित करण्यास स्थगिती

अंबाजोगाई – जगमित्र शुगर्स या प्रस्तावित कारखान्यासाठी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या सह तिघांविरुद्ध फसवणूक केल्याच्या खटल्यात अंबाजोगाई न्यायालयाने धनंजय मुंडे व अन्य तिघांना दोषमुक्त केले होते. त्यावर अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला पुन्हा सुरू करण्याचा अर्ज केल्यानंतर न्यायालयाने तो खटला पुनरुज्जीवित करण्याच्या दिलेल्या निर्णयावर धनंजय मुंडे यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर स्थगिती दिली आहे.

न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या वतीने त्यांचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी स्थगिती अर्ज दाखल केला होता. धनंजय मुंडे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करे पर्यंत किंवा अपिलाची मुदत पूर्ण होई पर्यंत हा खटला चालविण्यास अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे.

२०११ -१२ साली खरेदी केलेल्या या जमिनीच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली, तत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी तपास करून तक्रारीत तथ्य न आढळल्याने गुन्हा दाखल केला नाही, त्यानंतर उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात दोन्ही पक्षांचे म्हणणे, साक्ष, पुरावे इत्यादी वस्तुस्थिती पाहून अंबाजोगाई न्यायालयाने धनंजय मुंडे व अन्य तिघांना दोषमुक्त केले होते. मात्र त्याविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलेल्या अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालयाने ऐकल्यानंतर स्थगिती देण्यात आली असून, श्री मुंडे यांना अपील करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे.

न्यायालयाचा स्थगिती निकाल स्वयंस्पष्ट असून तो न्यायालयाच्या पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. मात्र याबाबत अर्धवट माहितीच्या आधारे कुणीतरी खोडसाळपणाने चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले असून, संबंधितास कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे मुंडे यांचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सांगितले आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात