महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dhule : पुन्हा एकदा विद्यार्थ्याची आत्महत्या; नैराश्याचा बळी ठरला गुणवंत प्रथमेश!

धुळे | गुणवंत, अभ्यासू आणि स्वप्न पाहणारा विद्यार्थी प्रथमेश प्रदीप बागड (वय २२) याने नैराश्याच्या गर्तेत जाऊन राहत्या घरी बाथरूममध्ये टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांमधील वाढते नैराश्य आणि त्यावर उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

प्रथमेशने दहावीत ९०% गुण मिळवले होते. त्यानंतर बीएससी आयटी आणि एमसीए पूर्ण करताना विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्याला म्हैसूरमधील इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता होती. त्यासाठी त्याने संबंधित परीक्षा देखील दिली होती.

प्रथमेशच्या वडिलांचे रिक्षा चालवून घर चालते, संपूर्ण कुटुंब भाड्याच्या घरात राहते. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या प्रथमेशला सतत हे वाटायचे की, ‘माझ्यामुळे आई-वडिलांना जास्त खर्च सहन करावा लागतो.’ तो फारसा कोणाशी बोलत नसे, मित्रही नव्हते. लहानपणापासून तो एकटाच राहत असे, अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर उपाय काय?

प्रथमेशसारख्या विद्यार्थ्यांची ही वेदनादायी कहाणी समाजासाठी आणि शिक्षणसंस्थांसाठी एक गंभीर इशारा आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात याव्यात:
1. कॉलेज पातळीवर मानसिक आरोग्य कार्यशाळा – विद्यार्थ्यांसाठी नियमित mental health awareness workshops घ्याव्यात, ज्या त्यांच्या भावनिक आणि मानसिक संघर्षांवर मार्गदर्शन करतील.
2. काउन्सेलिंग सत्रे – प्रत्येक शैक्षणिक संस्थेत प्रशिक्षित समुपदेशक नेमणे बंधनकारक करावे. विद्यार्थी आपले मनमोकळे बोलू शकतील असे सत्र असावेत.
3. ‘मित्र मंडळ’ उपक्रम – एकटेपणातून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मैत्री आणि संवाद वाढवणारे उपक्रम राबवावेत.
4. पालक-शिक्षक संवाद वाढवावा – पालक आणि शिक्षक यांच्यात संवाद वाढवून विद्यार्थ्यांच्या बदलत्या वागणुकीकडे त्वरित लक्ष द्यावे.
5. सरकारी योजनांचा प्रचार व सहाय्य – गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती यांची माहिती वेळेवर मिळवून देण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा.
6. ‘तुम्ही एकटे नाही’ ही भावना रुजवावी – समाजातील प्रत्येक घटकाने युवकांच्या भावनांचा आदर करावा, त्यांच्या मनातील भीती, अपेक्षा आणि निराशा समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात