राष्ट्रीय ताज्या बातम्या

लोकसभेत हवाई वाहतूक संरक्षण विधेयकावर चर्चा; सुळे यांनी सरकारला विचारले कठोर प्रश्न

नवी दिल्ली : लोकसभेत हवाई वाहतुकीद्वारे वस्तू संरक्षण विधेयकावरील चर्चेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना, भारताचे माजी पंतप्रधान स्व. डॉ. मनमोहन सिंग यांनी हवाई मार्गामार्फत व्यापाराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले होते, असे नमूद करत त्यांच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या वाढविण्यात आली आणि हवाई सेवांचा विस्तार झाला, असे त्यांनी अधोरेखित केले.

“भारतीय हवाई सेवेला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळाली होती,” असे नमूद करत त्यांनी सभागृहात सादर झालेले विधेयक उशीरा आल्याची खंत व्यक्त केली. “जसा उशीरा मिळालेल्या न्यायाला अर्थ नसतो, तशीच अवस्था आजच्या विधेयकाची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सुळे यांनी सध्या अनेक विमान कंपन्यांना मदतीची गरज असल्याकडे लक्ष वेधले. “गो एअरवेज, जेट एअरवेज आणि किंगफिशर या कंपन्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार दिला होता. मात्र, डबघाईला आलेल्या या कंपन्यांसाठी सरकारने योग्य धोरण आखणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

डीजीसीए आणि विमान कंपन्यांमध्ये सुसंवादाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “सरकार अनेक बदल करत आहे, पण त्या बदलांचा प्रत्यक्ष फायदा होतो का, हे महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी हवाई इंधनावरील करांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली.

“गो ग्रीनचा नारा फक्त घोषणांपुरता न राहता, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढविल्याशिवाय विमान उद्योगाच्या समस्या सुटणार नाहीत,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

शेवटी, “चांगली सेवा, परवडणारे तिकीट दर आणि योग्य नियोजन केल्यास भारतीय विमान सेवा पुन्हा जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करू शकते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे