ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार बुधवारी सकाळी असतील On Duty

Twitter : @vivekbhavsar

मुंबई

महाराष्ट्रात आजच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेले एकमेव नेते म्हणजे अजित पवार. अजित दादा बैठकीला गैरहजर असले किंवा पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत दिसले नाहीत तर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीला अजित पवार उपस्थित नसल्याने (Ajit Pawar was absent from the cabinet meeting) ते सरकारवर नाराज आहेत, आशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, घशात तीव्र संसर्गामुळे ते आज अनुपस्थित होते, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. अजित दादा यांच्या कुटुंबात वावर असलेल्या त्यांच्या विश्वासू व्यक्तीने या महितील दुजोरा दिला.

या माहितगाराने सांगितले की, अजित पवार गेले तीन दिवस सतत फिरत असून बैठक घेत आहेत. सततचे बोलणे, धुळीत फिरणे यामुळे अजित दादा यांच्या घशाला तीव्र संसर्ग झाला. काल (सोमवारी) बारामतीमध्ये (Baramati) त्यांनी पहाटे ६.३० वाजता अधिकाऱ्यांकडून सादरीकरण घेतले, त्यानंतर लहान मुलांच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले, तेव्हाच त्यांना बोलण्याचा त्रास जाणवत होता.

या कौटुंबिक स्नेहयाने सांगितले की, बारामतीमध्ये सकाळी ७ वाजता एका परिचिताने त्यांना चहासाठी बोलावले. तिथे दादांनी दमदार नाश्ता केला. दिवसभर बारामतीमधील बैठक आणि भेटीगाठी संपल्यावर ते मुंबईकडे निघाले. सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दुपारी जेवण घेण्यास सांगितले, मात्र त्यांनी सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारी काहीही खाल्ले नाही. रात्रीही केवळ सूप घेऊन त्यांनी आराम केला.

आज मंगळवारी घशाला खूप त्रास असल्याने दादांनी बंगल्यावर आराम करणे पसंद केले. आता त्यांना आराम आहे आणि उद्याचा (बुधवार) चा कार्यक्रम तयार झाला असून सकाळी ८ वाजता शासकीय बंगल्यावर अभ्यागतांच्या भटीगाठी आणि नंतर शासकीय बैठकांना उपस्थित असतील.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात