महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार, राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन: नाना पटोले

भाजपा आणि निवडणूक आयोगाचा निषेध करणार

मुंबई : काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष (भा.ज.पा.) आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी, २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीला धक्का दिला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मोठा घोटाळा केला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात ५० लाख नव्या मतदारांची नोंद कशी झाली? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर ७६ लाख अधिक मतदान कसे झाले? निवडणूक आयोग या बाबींचे स्पष्टीकरण देत नाही. जनतेतून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी आहे.

लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेस २५ जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार, माजी आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात