महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीच्या वचननाम्यातील आश्वासनं पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी – आनंद परांजपे

मुंबई : महायुतीच्या वचननाम्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतेही मतभेद नाहीत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. महायुतीने महाराष्ट्रातील बळीराजाला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये अजित पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे, अशी चर्चा सुरू असल्यानंतर त्याचा खुलासा केला. आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार हे अर्थसंकल्पासंदर्भात बैठका घेऊन प्रत्येक खात्याचा आढावा घेत आहेत आणि मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या वचननाम्यातील सर्व घोषणा पूर्ण होईल.

आणि तसेच, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, अशी कोणतीही बातमी प्रसारमाध्यमांनी न चालेवू, असा सल्ला त्यांनी दिला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात