मुंबई : महायुतीच्या वचननाम्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतेही मतभेद नाहीत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. महायुतीने महाराष्ट्रातील बळीराजाला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये अजित पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे, अशी चर्चा सुरू असल्यानंतर त्याचा खुलासा केला. आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार हे अर्थसंकल्पासंदर्भात बैठका घेऊन प्रत्येक खात्याचा आढावा घेत आहेत आणि मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या वचननाम्यातील सर्व घोषणा पूर्ण होईल.
#Watch : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतेही मतभेद नाहीत. बळीराजाला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे. : आनंद परांजपे, मुख्य प्रवक्ता, राष्ट्रवादी कांग्रेस.#LoanWaiver #Farmers #Mahayuti #NCP @AjitPawarSpeaks @NCPAjitdada pic.twitter.com/DjL4wCHiYJ
— rajkaran (@therajkaran) January 24, 2025
आणि तसेच, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, अशी कोणतीही बातमी प्रसारमाध्यमांनी न चालेवू, असा सल्ला त्यांनी दिला.