ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोयाबीन-कापूस प्रश्नी शेतकरी नेते तुपकरांची आज पियुष गोयलांसोबत बैठक, फडणवीसांचीही उपस्थिती

मुंबई

सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलांसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरांची (Farmer leader Tupkar meeting with Piyush Goyal) आज 09 डिसेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी रविकांत तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. बैठकीसाठी तुपकर बुलडाण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून उद्या होणारी बैठक आज शनिवार 9 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वा. सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे.

सोयाबीन-कापूस प्रश्नी, नुकसान भरपाई, पीकविमा, दुष्काळ यासह अन्य मुद्दांवर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी राज्यभर आंदोलनाची भूमिका घेतली आहे. एल्गार रथयात्रा, त्यानंतर रेकॉर्डब्रेक एल्गार महामोर्चा, अन्नत्याग आंदोलन आणि मुंबईत जाऊन घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकार नरमले व तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथी गृहावर सरकारने विस्तृत चर्चा केली. या बैठकीत सरकारने बहुतांशी मागण्या मान्य करत देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा शब्द तुपकर व शेतकऱ्यांना दिला होता.

विशेष म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुपकरांना या केंद्र सरकार सोबतच्या बैठकीचे निमंत्रण दिले असल्याचे समजते. शब्द दिल्याप्रमाणे शनिवारी दि.09 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वा. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सोयाबीन-कापूस प्रश्नी वाणिज्यमंत्री मंत्री पियुष गोयल यांचेसोबत फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यावेळी सोयाबीन-कापसाला खाजगी बाजारात दरवाढ मिळण्यासाठी आयत-निर्यात धोरणात काय बदल केले पाहिजे, या अनुषंगाने रविकांत तुपकर शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत. या बैठकीत काय होते त्यानंतर रविकांत तुपकर आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात