ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा काँग्रेसमधून राजीनामा; 48 वर्षांचा प्रवास अखेर थांबवला!

मुंबई

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) पक्षाचा राजीनामा दिला. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली. तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि माझ्यासाठी हा 48 वर्षांचा प्रवास महत्त्वाचा आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. सांगण्यासारखं बरंच आहे, काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं म्हणत त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. बाबा सिद्दीकींचे वांद्रे पूर्व आणि पश्चिम भागात वर्चस्व आहे. त्यांचे बॉलिवूडमधील दिग्गजांशीही चांगले संबंध आहे. बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी प्रसिद्ध असून यात सलमान खान, शाहरूख खानसह मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावतात.

बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास
बाबा सिद्दीकी यांचे वडील वांद्रे येथे घड्याळ बनवण्याचे काम करायचे. सिद्दीकीही त्या कामात वडिलांना मदत करत होते. अभ्यासादरम्यान राजकारणात रस निर्माण झाला आणि १९७७ मध्ये ते एनएसयूआय मुंबईचे सदस्य झाले. १९८० मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि 82 मध्ये अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर महापालिकेत प्रवेश झाला. त्यांनी तिथे स्वत:ला सिद्ध केले. निवडणूक लढवली आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा विधानसभेत पोहोचले. 2004 ते 2008 या काळात ते मंत्रीही होते. सध्या त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी या जागेवरून आमदार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात