महाराष्ट्र ताज्या बातम्या

यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेलाच जमा होणार!

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची ठाम ग्वाही

मुंबई : एसटी महामंडळाच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला पगार बँक खात्यात जमा होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केली. “हा माझा शब्द आहे आणि याची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो,” असे ठाम आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यापूर्वी त्यांनी मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य, परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

सरनाईक म्हणाले, “आर्थिक अडचणींमुळे मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना केवळ ५६ टक्के वेतन देणे ही दुर्दैवी परिस्थिती उद्भवली. मात्र यापुढे अशी वेळ येणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. महिनाभर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे, ही सरकारची जबाबदारी आहे. मी स्वतः अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून हे सुनिश्चित करीन.”

’एसटी’ला प्रवासीभिमुख बनवणार

“महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेसाठी सुरक्षित आणि किफायतशीर सेवा देणारी ‘एसटी’ ही राज्याची ‘लोकवाहिनी’ आहे. त्यामुळे ही यंत्रणा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन,” असे सांगत सरनाईक यांनी विविध सुधारणा योजनांचे संकेत दिले.

महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:
• बसस्थानकांवरील स्वच्छता: सर्व बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अत्याधुनिक, स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यात येणार.
• प्रवासी सुरक्षेचा विचार: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पॅनिक बटण आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली जाणार.
• जागा विकास प्रकल्प: ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर ६६ ठिकाणी खासगी सहभागातून एसटीच्या जागांचा कायापालट.
• नवीन बस ताफा: यंदा २,६४० नवीन बस ताफ्यात दाखल होणार; सध्या ८०० हून अधिक बस सेवा देत आहेत.
• विशेष बस सेवा: ग्रामीण भागांसाठी मिडी बसेस व शहरी भागासाठी २०० वातानुकूलित, शयनयान बस उपलब्ध करून देण्याची योजना.

“शहरांपासून खेड्यांपर्यंत आणि महानगरांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटीची सेवा पोहोचवणे, हे आमचे ध्येय आहे,” असे ठाम विधान सरनाईक यांनी यावेळी केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात