महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – तातडीने मदत द्या; कर्जमाफीची घोषणा करा – काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेला बाजूला सारून शेतकऱ्यांना तातडीने एकरी ₹२० हजार व हेक्टरी ₹५० हजार मदत द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारकडे केली आहे.

गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांना खरिपासाठी मोफत बियाणे व खते दिली पाहिजेत. अद्याप कर्जमाफी जाहीर झालेली नाही, किमान कर्ज पुनर्गठन तरी तातडीने करावे.

त्याचबरोबर, कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा व मुंबई तुंबल्याने शिंदे गटाचा भ्रष्टाचार उघड झाला असून, एकाच पावसाने त्यांच्या कथित विकासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. अनेक कोटी खर्चूनही मुंबई पाण्याखाली गेली, झाडांची कत्तल करून भुयारी मेट्रो लादण्यात आली, त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत.

सपकाळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आलेल्या संकटावर शाह यांनी एक शब्दही काढलेला नाही. प्रचारात सिलिंडर, कर्जमाफी, आणि लाडक्या बहिणीसाठी ₹२१०० देण्याची वचने दिली होती, ती विसरली गेली आहेत.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे मोहन जोशी व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात