महाराष्ट्र ताज्या बातम्या

तळीये दरडग्रस्तांचे पुर्नवसन तातडीने करा – अंबादास दानवे यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला चार वर्षे होत आली, तरी आजही सर्व दरडग्रस्त कुटुंबांचे पुर्नवसन झालेले नाही, ही बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणली.

दानवे म्हणाले, “या दुर्घटनेत ६६ लोकांचा मृत्यू झाला. शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते, मात्र केवळ ६६ कुटुंबांनाच घरे मिळाली असून, उर्वरित कुटुंब आजही असुरक्षित ठिकाणी राहतात. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवास यांचा अभाव अद्याप कायम आहे.”

त्यांनी यासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त करत आगामी पावसाळ्यात अशाच दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पुर्नवसन करण्याची मागणी केली. यासोबतच माळीण (पुणे) आणि कर्जत तालुक्यातील दरड दुर्घटनांचा उल्लेख करत, सरकारने अशा घटनांकडे अद्यापही गंभीर दखल घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दानवे यांनी आज विधान परिषदेत महाराष्ट्र विधानपरिषद नियम २८९ अन्वये या विषयावर सविस्तर चर्चा घेण्याची सूचना सादर केली

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात