महाराष्ट्र ताज्या बातम्या

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पुढील पाच वर्षांत दरवर्षी ५ हजार अशा एकूण २५ हजार नव्या बस खरेदी करणार असून, यापैकी २० हजार बसेस पर्यावरण पूरक हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या असतील. या बसेस सीएनजी आणि एलएनजीसारख्या स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल इंधनासोबत आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी डिझेल इंधनावर देखील चालू शकतील, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

पर्यावरण पूरक इंधन वापरावर भर

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटीच्या बहुतांश बसेस सध्या डिझेलवर चालतात. एकूण खर्चाच्या सुमारे ३४ टक्के रक्कम इंधनावर खर्च होते. दररोज सुमारे १०.७ लाख लिटर डिझेल लागते आणि वर्षाला सुमारे ३४ हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतो.”

भविष्यात डिझेलची उपलब्धता व दरातील चढउतार लक्षात घेता, पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा आहे. सीएनजी व एलएनजी हे डिझेलपेक्षा स्वस्त, पर्यावरणपूरक आणि अधिक कार्यक्षम इंधन पर्याय आहेत. डिझेलच्या तुलनेत बस प्रति लीटर ५ ते ५.५ किलोमीटर अंतर सीएनजी/एलएनजीवर पार करते, तर डिझेलवर हे अंतर केवळ ४ किलोमीटर असते. त्यामुळे इंधन खर्चात मोठी बचत होणार असून प्रदूषणातही घट होणार आहे.

एलएनजी इंधनावर २०% सूट, दरवर्षी २३५ कोटींची बचत

एसटी महामंडळाने किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत एलएनजी इंधन पुरवठ्यासाठी केलेल्या करारानुसार, डिझेलच्या तुलनेत २० टक्के कमी दराने एलएनजी पुरवठा केला जाणार आहे. यामुळे एसटीला दरवर्षी सुमारे २३५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

इंधन वितरणासाठी ११० पंप उभारले जाणार

राज्यभरात ९० ठिकाणी एलएनजी पंप आणि २० ठिकाणी सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. या पायाभूत सुविधांमुळे भविष्यात इंधनपुरवठ्याची सुलभ व्यवस्था उभी राहील. डिझेलसह सीएनजी व एलएनजीवर चालणाऱ्या हायब्रीड बस तयार करण्यासाठी बस उत्पादक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

“एसटीच्या ताफ्यात हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या पर्यावरणपूरक बसांचा समावेश करून खर्चात बचत व प्रदूषणात घट हे दोन्ही उद्दिष्ट साध्य केले जाईल,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात