महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘भांडूपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय?’ – संजय राऊत यांच्यावर संजय निरुपम यांचा हल्लाबोल

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण असताना, या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर थेट आरोप करत “भांडूपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय” अशी कठोर टीका केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत निरुपम यांनी राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत जनतेलाही त्याचा विरोध करण्याचे आवाहन केले.

निरुपम म्हणाले, “पाकिस्तानला पहलगाम हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधी ठोस पावले उचलली जात आहेत. सिंधू जल करार स्थगित करण्यात आला असून चिनाब व झेलम नद्यांवर धरणांचे काम थांबवले आहे. लष्कराकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू आहे.”

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना निरुपम म्हणाले की, “हुकुमशाहीविरोधात लढा देतो म्हणणारे राऊत निवडणुकीनंतर भाजपसोबत पुन्हा हातमिळवणीसाठी उद्धव ठाकरेंमार्फत प्रयत्न करत होते.” त्यांनी दावा केला की, ठाकरे गटाचे अनेक खासदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते आणि खुद्द ठाकरे यांनीच त्यांना रोखले होते. मात्र आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यासाठी दरवाजे बंद केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, ‘लाडकी बहिण योजना बंद झाली’ असा संजय राऊत यांनी काल केलेला दावा खोटा असून, ती योजना सुरुच आहे आणि भविष्यात लाभ वाढवण्याचा सरकारचा मानस आहे, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात