महाराष्ट्र ताज्या बातम्या

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – कृषी आयुक्त सुरज मांढरे

मुंबई : शासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान आधारित अनेक टूल्स उपलब्ध आहेत. माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामकाजावर देखरेख आणि अहवाल लेखन यासाठी या टूल्सचा वापर केला गेल्यास प्रशासनात निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असे प्रतिपादन कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले.

मंत्रालयाच्या परिषद सभागृहात “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” उपक्रमांतर्गत ‘तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर मांढरे आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक यांचे व्याख्यान झाले. महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील निवासी आयुक्त आर. विमला यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कृषी आयुक्त मांढरे म्हणाले, “गुगल किप, एव्हरनोट, मायक्रोसॉफ्ट वन नोट, ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, क्लिकअप, टू डू, कॅलेंडर, शीट्स आणि टेलिग्राम यांसारख्या टूल्सचा प्रभावी वापर करून कार्यक्षमतेत वाढ करता येते. तंत्रज्ञान कोणताही भेदभाव करत नाही. त्यामुळे प्रत्येकाने ते आत्मसात करणे आवश्यक आहे. स्मार्ट वर्क हे आजच्या काळाचे खरे वैशिष्ट्य आहे.”

ते पुढे म्हणाले की, पेन्सिल असलेल्या टॅबलेट्सचा वापर कामकाजात फारच उपयुक्त ठरतो. मायक्रोसॉफ्ट वन नोटसारखी टूल्स अनेक शासकीय अडचणी सोडवू शकतात. त्यामुळे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने तांत्रिक कौशल्य आत्मसात करावे.

डॉ. विकास नाईक यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, ‘Any Do’ सारखी अ‍ॅप्लिकेशन्स टास्क मॅनेजमेंटसाठी उपयुक्त असून ‘Excel’चा वापर करून क्षेत्रीय स्तरावर डेटा व्यवस्थापन सुलभ होते.

‘महाराष्ट्र सिव्हिल सर्विस’ या संकेतस्थळाची माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, या प्लॅटफॉर्मवर नागरिक कोणत्याही विभागास प्रश्न विचारू शकतात आणि अधिकाऱ्यांकडून थेट उत्तर मिळवू शकतात.

तसेच ‘महासंपर्क’ अ‍ॅपच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची माहिती सहज मिळवता येते. प्रशासनातील समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय आणि तंत्रज्ञानाचा योग्य संगम आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या विविध योजनांची माहिती देताना डॉ. नाईक यांनी नवकल्पनांची अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग हे आजच्या प्रशासनाची गरज असल्याचे स्पष्ट केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात