ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे तरुणांसाठी प्रचंड प्रेरणादायी पुस्तक : खा वर्षा गायकवाड

X : @therajkaran

मुंबई : आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) व सर्व महामानव समजून सांगणे गरजेचे आहे, शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबासाहेब जर आजच्या पिढीला समजले तर ही पिढी आपल्या आयुष्यात यशाला नक्की गवसणी घालेल, त्यासाठी आजच्या प्रत्येक तरुणाने ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री व नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड (MP Prof Varsha Gaikwad) यांनी मुंबई येथे बोलताना व्यक्त केले. ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या १३ व्या आवृत्तीचे प्रकाशन खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या फक्त दीडशे दिवसांमध्ये 13 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या बेस्ट सेलर प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात (Columbia university, USA) प्रोफेसर असलेले डॉ. सुरज एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे, तर पुढील तेराव्या आवृत्तीचे प्रकाशन आज शुक्रवारी मुंबईत खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस नेते सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, लेखक जगदीश ओहोळ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे