महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : भाजपच्या सर्वेक्षणानं शिंदे गटाच्या दोघांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता

X: @theRajkaran

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. तर भाजपकडून (BJP) सर्वेक्षणाचा दाखला देत कोल्हापुरातील दोन्ही जागेवर दावा केला जात आहे. खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगलेमधून (Hatkanangle) उमेदवारी शिंदे गटाकडून निश्चित मानली जात असली, तरी भाजपने केलेला अंतर्गत सर्व्हे या दोघांविरोधात असल्याने त्यांनी थेट उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्या दोन्ही जागा बदलणार की का? अशी शंका उपस्थित झाली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांचाही पत्ता राखून ठेवला आहे. त्यामुळे या दोन्ही नावांसाठी भाजपकडून आग्रह सुरू आहे. दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षितपणे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपकडून या दोन्ही उमेदवारांना बदलण्यासाठी शिंदेंवर दबाव आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये सातत्याने दौरे करत या दोन्ही मतदारसंघांवरील दावा कायम केला आहे. तीन दिवसात दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौरा केला. मात्र, भाजपकडून वाढत चाललेला दबाव यामुळे ते दोन्ही उमेदवार बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात