महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : महायुतीच्या उमेदवारासाठी हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करू : घाटगे यांच्या  उमेदवारीवर मुश्रीफांची प्रतिक्रिया

X: @therajkaran

मुंबई: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) महायुतीकडून भाजप आमदार समरजीतसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) हे महाविकास आघाडीतील करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या विरोधात उभे राहणार आहेत. यावरून आता कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif) निवडणुकीसाठी महायुतीकडून जो उमेदवार असेल, त्याच्यासाठी मी हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करेल असं वक्तव्य केल आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांचे राजकीय वैर आहे. तरी देखील महायुतीच्या उमेदवारासाठी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. समरजीतसिंह घाटगे यांच्या उमेदवारीवर मुश्रीफ यांनी बोलताना ‘महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हाडाची काडं रक्ताचं पाणी करेन, कोण उमेदवार दिला जाणार, याबाबत मला माहिती नाही. मात्र, जो उमेदवार देतील त्याचा मला प्रचार आणि नेतृत्व करावं लागेल. दुसरं काही करण्याचा आमचा स्वभाव नाही. आज तर आमच्या डोळ्यांसमोर संजय मंडलिक (Sanjay Mandlik) हेच उमेदवार असल्याचे’ मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आदर असेल तर निवडणूक बिनविरोध करा, अशी भूमिका आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी मांडली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला आहे. त्यांच्यात इतका बालिशपणा कुठून आला हे समजत नाही. राजकारणामध्ये असं होत नसतं. आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो. आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये, ही आमची त्या पाठीमागची भावना होती, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात