ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपकडून तिकीट दिलेले उमेदवार पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार

नवी दिल्ली

भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांनी बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून भोजपुरी स्टार पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. आता पवन सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आसनसोलमधून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

त्यांनी लिहिलं, ‘मी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला आसनसोलमधून उमेदवारी जाहीर केली. पण काही कारणास्तव मी आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही.

या भोजपुरी कलाकारांना भाजपकडून तिकीट…
भाजपच्या पहिल्या यादीत आसनसोलमधून पवन सिंग, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, यूपीमधील गोरखपूरमधून रवी किशन, यूपीमधील आझमगडमधून दिनेश लाल यादव निरहुआ यांच्याशिवाय चार भोजपुरी कलाकारांना तिकीट देण्यात आले आहेत. मात्र आता पवन सिंग यांनी आसनसोलमधून निवडणूक लढवण्यास नकार देऊन सर्वांना चकित केले.

शनिवारी जेव्हा पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा पवन सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले होते.

निवडणूक लढवण्यास का दिला नकार?
पवन सिंह यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पवन सिंह यांच्या जुन्या गाण्यांवरुन वाद सुरू केला. पवन सिंह यांच्या एका जुन्या गाण्याचे बोल आहेत… बंगाल वाली माल… यावरुन वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचं गाणं पाहून मी शरमेने झुकलो. लोकशाहीचा अंत जवळ आला आहे. टीएमसीने भाजपवरही निशाणा साधला आणि पक्षाचे नेते साकेत गोखले यांनी आसनसोलमधून पवन सिंह यांना उमेदवारी दिल्याबद्दल भाजपवर टीका केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे