ताज्या बातम्या महाराष्ट्र

Lok Sabha Election : रामदास आठवलेंना दोन जागांची अपेक्षा, मंत्रिपद देण्याचीही मागणी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडी येत्या दोन दिवसात जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान रामदास आठवले यांनी दोन जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे.याशिवाय निवडणुकीनंतर पक्षाला मंत्रीपद देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याबाबत रामदास आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मंत्रिमंडळात मला स्थान देण्यात आलं. आता आम्हाला महाराष्ट्रातून सोलापूर आणि शिर्डी या दोन जागांची अपेक्षा आहे. मात्र एकही जागा मिळाली नाही तरी एनडीएची साथ लगेचच सोडण्याचा विचार करणार नाही, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीपासून वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न…
यावेळी रामदास आठवले यांनी वंचितला महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा सल्ला दिला आहे. कारण वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. इच्छूक नसतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल केली जात आहे. असं करून ते वंचितचा अपमान करीत आहे. अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊ नये असा सल्ला रामदास आठवले यांनी वंचितला दिला आहे.

मुंबईच्या दौऱ्यावेळी राहुल गांधी चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेतलं, याबाबत रामदास आठवले यांनी राहुल गांधींचे आभार मानले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण करू दिली. त्यावेळी त्यांच्याही मोठ्या सभा होता, मात्र फार मिळेल असं वाट नाही, असंही आठवले यावेळी म्हणाले.

अजित दादांचा विस्तार झाला, मात्र आमचा विकास होऊ शकला नाही, त्यामुळे या निवडणुकीनंतर रिपल्बिकन पक्षाला मंत्रिपद द्यावं. सोलापूर आणि शिर्डी येथे शिंदे गटाचे खासदा आहे. मात्र आम्हाला तिथं संधी दिली तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये फायदा होईल. महाराष्ट्रातील सत्तेमध्ये आम्हाला वाटा मिळाला नाही, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात