महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : महाड तालुका २४ तास अंधारात!

मतांचा जोगवा मागणारे नेते गायब, जनतेने दाद कोणाकडे मागायची?

महाड – संपूर्ण महाड तालुक्यावर गेल्या २४ तासांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले असून, महाड औद्योगिक वसाहतीजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत वाहिनी तुटल्याने संपूर्ण शहर व तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रचंड उन्हाच्या झळा सहन करत असलेली जनता त्रस्त झाली असतानाही निवडणुकीच्या काळात मतांचा जोगवा मागणारे नेते मात्र गायब आहेत.

या पार्श्वभूमीवर शिरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी प्रशासन व राजकीय नेत्यांना प्रश्न विचारत जनतेच्या वतीने आवाज उठवला आहे – “ही जनता न्याय कोणाकडे मागायची?”

१७ एप्रिल २०२५ पासून वीजपुरवठा खंडित झाला असून, या संपूर्ण प्रकरणामागे महाड औद्योगिक वसाहतीतील रस्ते व गटाराच्या कामात ठेकेदाराची बेपर्वाई आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जबाबदार असल्याचे समोर आले आहे. JCB ने खोदकाम करताना MSEB च्या २२ केव्ही भूमिगत विद्युत वाहिनीला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचले आहे.

अंधारामुळे तालुक्यातील सर्व गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. लग्नसराई, जत्रा, यात्रा यासारख्या सण-समारंभांवरही परिणाम झाला आहे. पाणीपुरवठ्यावरही याचा मोठा परिणाम जाणवतो आहे.

या संदर्भात सरपंच ओझर्डे यांनी MSEB चे कार्यकारी अभियंता रामकृष्ण पाटील यांच्याशी थेट संपर्क साधून जनतेचा रोष व्यक्त केला आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी शुक्रवारी रात्री विद्युत कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि खोदकामाच्या ठिकाणी स्वतः पाहणी केली. यावेळी महाड महावितरणचे अधिकारी भोई यांनीही वायर डॅमेज झाल्याचे मान्य केले.

सरपंच ओझर्डे यांनी सांगितले की, महाडसारख्या औद्योगिक तालुक्याला स्थिर व सक्षम वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र EHP (Extra High Power) स्टेशनची नितांत आवश्यकता आहे. यासाठी शिरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. हा प्रस्ताव विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्वरीत पाठवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहर आणि ग्रामीण भागांमध्ये भेदभाव न करता सर्वांनाच समान वीजपुरवठा मिळावा, हीच तालुकावासीयांची अपेक्षा आहे.

“चार महिन्यांपूर्वी मतांचा जोगवा मागणारे नेते आता कुठे आहेत? अंधारात तडफडणाऱ्या जनतेबद्दल त्यांना काही देणे-घेणे नाही का?” असा थेट सवाल ओझर्डे यांनी राजकीय पुढाऱ्यांना केला आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात