महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 अद्याप घोषित नाही : अनिल गलगली

मुंबई: महाराष्ट्र शासनाने अद्याप 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केलेला नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीच्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कार्यक्रम अधिकारी नि. ज्ञा. धुमाळ यांनी सांगितले की, 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 22 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदान करण्यात आला होता, आणि 2024 च्या पुरस्कारासाठी 2 जानेवारी 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

1996 पासून 2023 पर्यंत एकूण 19 महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, 2012, 2013, 2014, 2016, 2017, 2018, 2019, आणि 2020 या वर्षांत हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यामुळे शासनाने त्वरित 2024 चा पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या प्राप्त मान्यवरांमध्ये 1996 साली पु. ल. देशपांडे (साहित्य), 1997 साली लता मंगेशकर (संगीत), 1998 साली सुनील गावसकर (क्रीडा), 1999 साली डॉ. विजय भटकर (विज्ञान), 2001 साली सचिन तेंडुलकर (क्रीडा), 2002 साली पं. भीमसेन जोशी (कला/संगीत), 2003 साली डॉ. अभय बंग आणि राणी बंग (समाज प्रबोधन), 2004 साली बाबा आमटे (समाज प्रबोधन), 2005 साली डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), 2006 साली रतन टाटा (उद्योग), 2007 साली रा. कृ. पाटील (समाज प्रबोधन), 2008 साली मंगेश पाडगावकर (साहित्य), 2008 साली नानासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), 2009 साली सुलोचना लाटकर (मराठी चित्रपट), 2010 साली जयंत नारळीकर (विज्ञान), 2011 साली अनिल काकोडकर (विज्ञान), 2015 साली बाबासाहेब पुरंदरे (साहित्य), 2021 साली आशा भोसले (संगीत), 2022 साली डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), आणि 2023 साली अशोक सराफ (मराठी चित्रपट) यांचा समावेश आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात