महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात; उर्वरित खरेदीसाठी केंद्राकडे मुदतवाढीची मागणी

मंत्री जयकुमार रावल यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई : राज्य सरकारने मागील वर्षात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असल्याने केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदतवाढ मागितल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या सूचनेला उत्तर देताना मंत्री रावल यांनी राज्यातील सोयाबीन खरेदीची सद्यस्थिती स्पष्ट केली.

राज्यात ५६२ खरेदी केंद्रे आणि ७१० गोदामे

मंत्री रावल म्हणाले की, राज्यात ५६२ खरेदी केंद्रांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी करण्यात आली. तसेच ७१० गोदामांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, आता ही गोदामे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

खरेदीला अडथळे आणि बाजारातील संतुलनाचा विचार

सोयाबीन थेट वापरले जाणारे उत्पादन नसल्याने त्याच्या साठवणुकीसाठी प्रक्रिया केंद्रांची संख्या अपुरी पडत आहे. त्याचबरोबर तूर, कापूस यांसारख्या उत्पादनांची खरेदीही सुरू असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

हमीभावापेक्षा कमी दराने बाजारात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध शासन कारवाई करू शकते. मात्र, त्यामुळे खरेदी बंद झाल्यास दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील संतुलन राखणे आवश्यक असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.

राज्य सरकार केंद्राकडे मुदतवाढीची मागणी करणार

महाराष्ट्रात विक्रमी सोयाबीन उत्पादन झाल्यामुळे खरेदीसाठी अजूनही उपाययोजना आवश्यक आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी करण्यात येईल, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात