महाराष्ट्र ताज्या बातम्या

नवी मुंबई विमानतळासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यास कौशल्य विभाग सज्ज

प्रकल्पग्रस्तांना विमानतळ सेवा क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई : राज्यातील लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कौशल्य विकास विभागाने आता नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. सिडको आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष प्रशिक्षण योजना

नवी मुंबई विमानतळासाठी काही गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सिडकोने प्रकल्पग्रस्तांना विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव कौशल्य विकास विभागासमोर सादर केला होता. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली, आणि त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांसाठी रोजगाराचे नवे दार उघडले आहे.

विमानतळाशी संबंधित पाच व्यावसायिक अभ्यासक्रम

या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत पाच महत्त्वाचे अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत:
• एअरलाईन बॅगेज हँडलर
• एअरपोर्ट टर्मिनल ऑपरेशन्स
• एअरपोर्ट कार्गो ऑपरेशन्स
• कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह
• एअरलाईन ग्राउंड स्टाफ

प्रथम टप्प्यात ११९१ प्रकल्पग्रस्तांनी नोंदणी केली असून महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम संकेतस्थळावर (https://www.mahaswayam.gov.in) आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

सामाजिक दायित्वातून कौशल्य विकास विभागाचा पुढाकार

कौशल्य विकास विभागाने आतापर्यंत लाखो तरुणांना व्यावसायिक व औद्योगिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सामाजिक बांधिलकीच्या या धोरणांतर्गत नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सक्षम करण्यासाठी हा मोठा उपक्रम राबविला जात आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने सिडको-राज्य सरकारचा उपक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कौशल्य विकास विभाग आणि सिडको संयुक्तपणे प्रकल्पग्रस्तांना मदतीचा हात देणार आहेत. यामुळे नवी मुंबई हे जागतिक स्तरावर महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येईल आणि या यशात कौशल्य विकास विभागाचा मोठा वाटा असेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात