महाराष्ट्र ताज्या बातम्या

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर तोडगा शोधण्यासाठी आमदारांची बैठक – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील वनविभागाच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना वाघांच्या हल्ल्यांचा धोका वाढला आहे. या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाल्यास अपुरी नुकसानभरपाई, कठोर वनकायदे आणि वनअधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी संबंधित विभागीय मंत्री आणि वाघ-बिबट्यांचा वावर असलेल्या भागातील सर्व आमदारांची बैठक आपल्या दालनात आयोजित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

विधानसभेतील लक्षवेधी सूचनेच्या वेळी विजय वडेट्टीवार आणि अन्य चार सदस्यांनी नियम 105 अंतर्गत हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत झालेल्या शेतकरी कुटुंबांना ₹40 लाख नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. तसेच, कठोर वनकायद्यांमुळे शेती उद्ध्वस्त होत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी, “भूमीची उपलब्धता मर्यादित असताना लोकसंख्या आणि वन्यप्राणीसंख्या वाढत आहे. वन्यप्राण्यांचे नैसर्गिक खाद्य त्याच भागात उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाकाहारी प्राण्यांसाठी नैसर्गिक खाद्य पुरवण्यासाठी झाडे लावण्यात येतील,” असे सांगितले.

आमदार नाना पटोले यांच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह बैठकीच्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी पाठिंबा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी दुपारी ३ वाजता आपल्या दालनात बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात