मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदरमध्ये डॉ. आंबेडकर स्मारक उभारणार; १.४६ कोटी निधी मंजूर

Social Justice Minister Sanjay Shirsat and Transport Minister Pratap Sarnaik during a meeting in Mumbai discussing Ambedkar memorial project in Mira Bhayandar

मुंबई  — मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर (सर्वे क्र. २३३) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या प्रकल्पाअंतर्गत डॉ. आंबेडकर यांच्या १६ फुटी पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे २०० चौ.मी. जागा निश्चित करण्यात येत असून ती महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या संदर्भात मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

संबंधित जागा यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी स्मारकासोबत बहुउद्देशीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव असून, प्रकल्पासाठी आधी सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर अतिरिक्त २० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रस्ताव संबंधित समितीकडे सादर करण्यात आला असून, पुढील सहा महिन्यांत पुतळा उभारणी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

1 Comment

  1. Carmine Sauceda

    April 8, 2026

    Wow that was odd. I just wrote an very long comment but after I clicked submit my comment didn’t show up. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyways, just wanted to say great blog!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात