ताज्या बातम्या महाराष्ट्र

नार्वेकरांच्या निकालानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीची शक्यता

मुंबई

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल दिल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नार्वेकरांविरोधात आंदोलन पुकारले. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेली नवी याचिका नाही.

दरम्यान नार्वेकरांच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. १६ जानेवारी रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याती शक्यता व्यक्त केली जात आहे.

राहुल नार्वेकर यांनी कोणालाह अपात्र न करता शिवसेना हा पक्ष शिंदेंना दिला, त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका जाहीर करण्यात आली. परंतू अद्याप राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी होणारी सुनावणी ही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर होईल.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात