ताज्या बातम्या महाराष्ट्र

पक्षातील ‘कोल्डवॉर’ संपवण्यासाठी राज ठाकरे नाशकात, 4 फेब्रुवारीपर्यंत तळ ठोकणार

नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा नाशिक दौरा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पक्षांतर्गत कोल्डवॉरमुळे मनसेची महानगरपालिकेतील सत्ता आणि शहरातील ३ आमदार गेले. नाशिकमधील पक्षांतर्गत मतभेदामुळे राज ठाकरेंना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

राज ठाकरे ४ फेब्रुवारीपर्यंत नाशिकमध्ये तळ ठोकणार आहे. यादरम्यान ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे.

एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र पदाधिकाऱ्यांमधील कलहामुळे पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला. गेल्या काही काळात मनसेमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप किंवा इतर पक्षांसोबत जाणं पसंत केलं. नाशिकमधील पक्षाची मोट बांधण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. दिलीप दातीर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली, मात्र अचानक वैयक्तिक कारण सांगत त्यांनी पक्षप्रमुखांकडे पदमुक्त करण्याची विनवणी केली. पुढे ही जबाबदारी सुदाम कोंबडे यांच्यावर सोपवण्यात आली. संघटना मजबूत करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांमधील संबंध चांगले राहावे यासाठी अमित ठाकरे वारंवार नाशिकचा दौरा करीत होते. मात्र प्रत्यक्षात फारसा फरक पडला नसल्याचं सांगितलं जात आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात