ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणारा मोरिस 4 दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ

दहिसर

ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर लाइव्ह गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर गुंड मोरिस नरोन्हा याने गोळ्या झाडल्या आणि यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गुंड मोरिस नरोन्हा चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आला होता आणि येथे मोरिसला शिंदे सेनेत येण्याचं आमंत्रण देण्यात आल्याचा मोठा दावा राऊतांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वेगवेगळ्या गुंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी शिंदेंचा मॉरिससोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. पुढे राऊतांनी लिहिलं आहे, महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिस नरोन्हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरिस याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी ठरले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.

गुंड मोरिसने आधी अभिषेक यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत: वर 4 गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे. काहींच्या मते राजकीय वैमनस्यातून, पैशांच्या वादातून सर्व प्रकार घडला असावा. दहिसरमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात