महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठ पेपर लीक प्रकरण तापलं: एबीव्हीपी रस्त्यावर, पोलिसांशी संघर्ष

ABVP student protesters confronting police during Mumbai University paper leak protest outside college

मुंबई — मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI) परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आक्रमक झाली असून, संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ABVP, मुंबई महानगराच्या वतीने बांद्रा येथील आर. डी. नॅशनल कॉलेजमध्ये 15 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत, जबाबदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पेपर लीक प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; परीक्षा रद्द करण्याची मागणी

TY B.Com (Sem VI) मधील तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर आल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एबीव्हीपीच्या मते, हा प्रकार केवळ अनियमितता नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार आहे.

प्रकरण उघडकीस आल्यानंतरही अद्याप ठोस गुन्हा नोंद, पारदर्शक चौकशी अहवाल किंवा जबाबदारी निश्चिती न झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काही विद्यार्थ्यांवर कारवाई करून मूळ जबाबदार यंत्रणा वाचवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

एबीव्हीपी च्या प्रमुख मागण्या

विद्यार्थ्यांचा संताप उफाळला; पोलिसांशी तीव्र वाद, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

संबंधित सर्व जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत
 परीक्षा केंद्रातील Chief Conductor, IT Coordinator यांचे निलंबन
संबंधित विषयांच्या परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा जाहीर करावी
स्वतंत्र आणि पारदर्शक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी

एबीव्हीपीचे मुंबई महानगर मंत्री Prashant Mali यांनी सांगितले की, या प्रकरणात सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आहे. “प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत असून, परीक्षा नियंत्रक उत्तर देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

“Managed or Manipulated?” — विद्यार्थ्यांचे थेट प्रश्न; पारदर्शक चौकशीची मागणी

विद्यापीठ प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई केली नाही, तर एबीव्हीपीकडून व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

The RajkaranNOTE

प्रश्नपत्रिका लीक हा फक्त शैक्षणिक मुद्दा नाही, तो विश्वास, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात