महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या जयकुमार गोरे यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर खुलासा मागवल्याची माहिती दिली

मंत्री नीतेश राणे विधानसभेत मुस्लिम आरक्षण आणि अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर उत्तर देताना

मुंबई : मुस्लिम व्यक्तीस जातीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळू शकतो; मात्र धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट उत्तर शासनाच्या वतीने मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.

समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांनी यासंदर्भात मूळ प्रश्न उपस्थित केला होता. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची १२५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे का, असल्यास हा निधी कधी देण्यात येणार, असा सवाल त्यांनी विचारला.

या चर्चेदरम्यान काँग्रेस सदस्य अमिन पटेल यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले की, मुस्लिम व्यक्तीस जातीच्या आधारे आरक्षण मिळू शकते; परंतु धर्माच्या आधारे आरक्षण देणे शक्य नाही. शासनाच्या भूमिकेची त्यांनी सभागृहात स्पष्ट मांडणी केली.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीही यावेळी उत्तर दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार शासन आवश्यक कार्यवाही करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

२०२६-२७ या वर्षासाठी अल्पसंख्यांक विकास विभागासाठी ६० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहितीही झिरवळ यांनी सभागृहात दिली.

काँग्रेस सदस्य अमित देशमुख यांनी सरकारचे अल्पसंख्यांक विकास विभागाकडे पुरेसे लक्ष नाही, अशी टीका करत उर्दू घरे, वाचनालये आणि निवासी शाळांना मान्यता देण्याची मागणी केली. यावर या मागण्यांवर विचार केला जाईल, असे आश्वासन मंत्री झिरवळ यांनी दिले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात