राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक अध्यक्ष, मुंबई ॲड. अमोल मातेले यांचा इशारा!
मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथली माती, हवा, पाणी, संस्कृती आणि भाषा मराठीच आहे. या भूमीत येऊन पोट भरायचं, इथल्या जमिनीवर पाय रोवायचे, धंदा करायचा, मोठं व्हायचं आणि वर इथल्या भाषेकडे तुच्छतेने पाहायचं? हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही!
महाराष्ट्राच्या संस्कृतीला हरामखोरीने झिडकारणाऱ्या प्रवृत्तीना ठेचल्याशिवाय राहणार नाही! असा कठोर इशारा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी “मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही” असे विधान केले. हे वक्तव्य म्हणजे मराठी अस्मितेचा अपमान आहे! लक्षात ठेवा – महाराष्ट्रात राहायचं असेल, इथल्या मातीत मिसळलं पाहिजे! नाहीतर महाराष्ट्र कधी काय करेल, हे सांगता येणार नाही! आमची सहिष्णुता ही आमची कमजोरी समजू नका!
मातेले म्हणतात, महाराष्ट्र म्हणजे कुणाच्या बापाचा बंगला नाही!
इथे राहायचं, मोठं व्हायचं, कमवायचं, पण मराठीत बोलायचं नाही? हे महाराष्ट्राला मान्य नाही!
छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव, शिवरायांच्या भूमीत राहून इथली भाषा नाकारणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही! मराठी शिकलीच पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात जगणं कठीण होईल! उगीच गोडगोड बोलून फोडाफोडीचे डाव टाकू नका!
महाराष्ट्रात राहायचं, कमवायचं, मोठं व्हायचं? तर मराठी शिकायलाच लागेल!
नाहीतर महाराष्ट्रात पाय रोवणं कठीण होईल!
“मराठीत बोलायला लाज वाटते? मग महाराष्ट्राच्या मातीशी गाठ आहे! असा इशारा देताना मातेले म्हणतात, महाराष्ट्राची माती मऊ आहे, पण वेळ आल्यावर दगड होते आणि कुणाच्या डोक्यात फोडायचा, हे आम्ही ठरवतो!
मराठी शिकलीच पाहिजे, नाहीतर मातीत पुरल्याशिवाय राहणार नाही! मराठीला कमी लेखणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जाईल, हे ठाम आहे!
बोललं ते ठरलं! जय महाराष्ट्र! असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.