महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagpur : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूरने ओलांडला 26 हजार घरांचा टप्पा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत नागपूर जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 26,588 घरांवर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यात आले असून, त्यातून 105.45 मेगावॅट सौर वीज निर्मिती क्षमता निर्माण झाली आहे.

ही योजना महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवता यावे यासाठी राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली असून, यामुळे सर्वसामान्यांना थेट लाभ होत आहे.

योजनेनुसार, घराच्या छतावर सौरऊर्जेचा प्रकल्प बसविला जातो. गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास ती महावितरणला विकता येते. केंद्र सरकारतर्फे प्रकल्प क्षमतेनुसार 1 किलोवॅटला 30,000 रुपये, 2 किलोवॅटला 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट प्रकल्पासाठी 78,000 रुपये अनुदान दिले जाते. महावितरणकडून ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येतो.

या योजनेची सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यात 16 एप्रिल 2025 पर्यंत 26,588 प्रकल्प बसविले गेले असून, फक्त एका दिवसात – 16 एप्रिलला – 212 घरांवर प्रकल्प बसविण्यात आले.

राज्यभरात आतापर्यंत 1,79,753 घरांवर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवले गेले असून त्यातून 651.42 मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यात नागपूर जिल्ह्याचा वाटा अनुक्रमे 14.79 टक्के (घरांच्या संख्येत) आणि 16.42 टक्के (वीजनिर्मितीत) इतका आहे.

या योजनेत आघाडीवर असलेले अन्य जिल्हे :
• जळगाव – 13,328 घरे
• पुणे – 12,775 घरे
• छत्रपती संभाजीनगर – 11,442 घरे
• नाशिक – 10,870 घरे
• अमरावती – 9,918 घरे
• कोल्हापूर – 8,017 घरे
• धुळे – 5,773 घरे
• सोलापूर – 5,441 घरे
• अहिल्यानगर – 5,197 घरे
• वर्धा – 4,871 घरे

योजनेची अंमलबजावणी महावितरणकडे असून, ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून लाभ घेता येतो. सुलभ कर्जप्रक्रिया व कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी बँकांशी समन्वय करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधी :
ग्रामीण भागातील ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या ग्रामपंचायतींना विशेष प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात