ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील एकही हिरे उद्योग सुरतला गेलेला नाही : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran

नागपूर

मुंबईतील एकही हिरेविषयक (Diamond business shifting to Gujarat) उद्योग गुजरातला गेलेला नाही. याऊलट देशातील सर्वात मोठा ‘जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क’ मुंबईत उभा राहतोय, सूरत डायमंड मार्केटमुळे (Surat Diamond market) येथील उद्योगावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. 

ते म्हणाले, सूरतमधील हिरे व्यापारास शिवाजी महाराजांपासून (Shivaji Maharaj) इतिहास आहे. तर हिरे उत्पादन २०१३ पासून आहे. आता एक नवीन इमारत निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रातील एकही हिरे विषयक उद्योग सूरतला गेलेला नाही. मुंबईतून होणारी हिरे निर्यात मोठी आहे. तेथील उद्योग बाहेर जात आहेत, यात काहीही तथ्य नाही. 

मलबार गोल्डज (Malabar Golds) ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांनी १७०० कोटींची आपल्या राज्यात गुंतवणूक केली, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुंबईशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. मुंबईचा हिरे व्यापारातला वाटा ७५ टक्क्यांचा आहे, तुलनेत गुजरातचा (Gujarat) खूप कमी आहे, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात