महाराष्ट्र

कोकणातील मच्छिमारांवरील हल्ले व परराज्यातून होणाऱ्या मासेमारीची दखल; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

नागपूर: पश्चिम किनारपट्टीवर कोकणातील मच्छिमारांना परराज्यातील आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून येणाऱ्या मोठ्या बोटी आणि ट्रॉलर्सकडून होत असलेल्या मासेमारीमुळे नुकसान होत आहे. तसेच स्थानिक मच्छिमारांवर समुद्रात होणारे हल्ले गंभीर बाब आहे आणि त्याची दखल घेतली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.

विधानसभेत औचित्याच्या मुद्यावर बोलताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच निवडून आलेले शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी कोकणातील मच्छिमारांचा प्रश्न उचलून धरला. त्यांनी कर्नाटक आणि अन्य राज्यांमधील मच्छिमार ट्रॉलर्स अत्याधुनिक बोटींच्या साहाय्याने कोकण किनारपट्टीजवळ मोठ्या प्रमाणावर मासेमारी करत असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे कोकणातील स्थानिक मच्छिमारांची जाळी तुटून मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

“काही ट्रॉलर्स आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडूनही येतात. समुद्रात कोणत्याही प्रकारची दक्षता, सुरक्षा किंवा प्रतिबंधक व्यवस्था का नाही?” असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला. याशिवाय, बाहेरील मच्छिमार स्थानिक मच्छिमारांवर हल्ले करत त्यांना जखमी करत असल्याचीही गंभीर बाब त्यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी विनंती राणे यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी औचित्याच्या मुद्यावर मंत्र्यांनी उत्तर देण्याची परंपरा नसल्याचे सांगितले. मात्र, मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत त्याची नोंद घेत असल्याचे त्यांनी सभागृहात जाहीर केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात