महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना – विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Twitter: @therajkaran

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालेला नसून मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणा बाबतची अधिसूचना काढल्याचा थेट व गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन केले आहे.ही सभा ओबीसींच्या संविधानिक हक्काच्या रक्षणासाठी आहे.आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असून या लढाईमुळे ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारकडून केले जात आहे,असा घणाघाती हल्लाबोल करत आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोधी नाही,असेही विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई येथे आज ओबीसी समाजाच्या संघटनांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना.

वडेट्टीवार म्हणाले की,गृहमंत्री म्हणतात भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.केंद्रीय मंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. तरं मुख्यमंत्री म्हणतात की,आंदोलकां वरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. तरं गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत.यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमधील विसंवाद दिसून येत असून हे सरकारच ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निर्माण करून दोन्ही समाजामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

सगेसोयरे शब्दामुळे ओबीसी आरक्षणात कोणाचाही शिरकाव होऊ शकतो.त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही.सध्याच्या अधिसूचनेत अटी शिथिल केल्यामुळे प्रमाणपत्र कोणालाही मिळू शकते हे चुकीचे आहे. सरकार एकाच समाजाचे हित पाहत आहे.सरकारची ही अडेलतट्टूपणाची भूमिका ओबीसी समाजाला खड्ड्यात घालणारी आहे,अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढत, समाजातील बांधवांनी १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूनेवर आक्षेप नोंदवावेत,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संभाजीनगर येथे २० फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार आहे. या सभेपूर्वी येत्या ५ तारखेपासून राज्यातील आमच्या शक्तीस्थळाना भेट देवून आम्ही स्फूर्ती घेणार आहोत. याची सुरूवात चैत्यभूमीपासून होणार आहे.मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन असल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोवर सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व्हेंवरही विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात