महाराष्ट्र ताज्या बातम्या

Operation Sindoor : CPI कडून स्वागत; दहशतवाद्यांच्या विरोधात भारतानं योग्य निर्णय घेतल्याचं मत

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि POKमधील दहशतवादी ठिकाणांवर सुरू केलेल्या “ऑपरेशन सिंदूर”चं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) स्वागत केलं आहे.

CPIच्या राष्ट्रीय कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या वक्तव्यात पक्षानं म्हटलंय की, या भीषण हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते. अशा वेळी दहशतवाद्यांच्या मूळ केंद्रांवर थेट कारवाई करणं भारतासाठी आवश्यक होतं. भारतीय हवाई दलानं केवळ दहशतवाद्यांचे केंद्र लक्ष्य केलं आणि पाकिस्तानी लष्कराला दूर ठेवून जबाबदारीनं पावलं उचललं – ही बाब कौतुकास्पद आहे, असं पक्षानं म्हटलंय.

CPIनं सरकारला आवाहन केलं आहे की, अशा गंभीर प्रकरणात सर्वपक्षीय बैठक बोलावून एकसंघ भूमिका घ्यावी. तसेच प्रदेशात दीर्घकालीन शांतता राखण्यासाठी राजनैतिक आणि चर्चेच्या मार्गांनी पुढे जावं.

पक्षानं पाकिस्तानलाही इशारा दिलाय की, ज्याला स्वतःला दहशतवाद्यांचं संकट भोगावं लागतं, त्या पाकिस्ताननं आपल्या भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी जाळ्यांचं निर्मूलन करावं.

CPIनं शेवटी असं म्हटलंय की, भारताच्या न्याय, धर्मनिरपेक्षता आणि एकतेच्या मूल्यांवर पक्षाचा ठाम विश्वास आहे आणि सगळ्या भारतीय जनतेची एकजूट हीच भारताची खरी ताकद आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात