ताज्या बातम्या महाराष्ट्र

कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकावर कारवाईचे आदेश

X : @therajkaran

नागपूर

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 18 रुग्णांच्या मृत्यू संबंधातील (Death in Kalwa hospital) अहवाल प्राप्त झाला आहे. घटना घडली तेव्हा सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक त्याठिकाणी हजर असायला हवे होते; ते तिथे नव्हते. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना आदेश आजच्या आजच देण्यात येतील, असे उत्तर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तर तासात दिले. 

ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation – TMC) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे 18 रुग्ण मृत्यू संबंधातील प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला होता. मंत्री सामंत उत्तरात म्हणाले, “त्या दिवशी झालेल्या 18 मृत्यूपैंकी 9 रुग्ण अचानक खासगी रुग्णालयांतून आयत्यावेळी दाखल झाले होते. त्यांची गंभीर स्थिती होती. त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी औषधे, ऑक्सिजन, खाटा उपलब्ध होत्या. औषधांअभावी किंवा सेवेअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही.” 

मंत्री म्हणाले, त्या रुग्णालयांमध्ये 48 पदांची भरती केली होती. यानंतर 145 पदांची भरती ही तात्पुरती आणि कायमस्वरुपी अशा स्वरुपात केली आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात