महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणी महानगरपालिकेचा अहिल्यादेवी होळकर पुतळा उभारणीचा ठराव; न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे अंमलबजावणी रखडली

मुंबई – परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील स्टेडियम प्रवेशद्वारानजीक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव महापालिकेने पारित केला आहे. मात्र, सदर जागेचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

यासंदर्भात डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुतळा उभारण्याची मागणी जनतेची असल्याचे नमूद केले. २६ ऑगस्ट २०१९ रोजी महापालिकेने यासंदर्भात ठराव संमत केला असला तरी, जागेवरील अतिक्रमणामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडली आहे.

या प्रकरणावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना सांगितले की, पूर्ण पडताळणी करून, आवश्यक जागा वगळून आणि अतिक्रमणे दूर करून हा प्रश्न मार्गी लावता येईल.

नागरिकांमध्ये या विलंबाबद्दल असंतोष असल्याचे काही सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात