महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणी ते मुंबई लॉंग मार्च औरंगाबादेत पोहोचणार – स्वागत, सभा आणि सहभागासाठी तयारी सुरू

औरंगाबाद : परभणी ते मुंबई या लॉंग मार्चचा औरंगाबादेत 27 जानेवारी रोजी मुक्काम असून, क्रांती चौकात त्याचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, डाव्या, आंबेडकरी आणि लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी नागरिकांना या लॉंग मार्चमध्ये सामील होण्यासाठी आवाहन केले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात आज डाव्या विचारांच्या पक्ष संघटनांची बैठक पँथर नेते रमेशभाई खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत लॉंग मार्चच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी विविध जबाबदाऱ्या वाटून घेण्यात आल्या.

लॉंग मार्च स्वागतासाठी सहभागी होणाऱ्या संघटना:
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), भारतीय दलित पँथर, भाकप माले, लाल निशाण पक्ष, बहुजन रिपब्लिकन समाज पक्ष, आयटक, दलित अधिकार आंदोलन, शेकाप, स्वराज अभियान, सत्यशोधक समाज, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती आणि इतर समविचारी संघटना या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन:
• ठिकाण: क्रांती चौक, औरंगाबाद
• तारीख: 27 जानेवारी
• सत्र: स्वागत व जाहीर सभा
• मार्गक्रमण: बुध्द लेणी परिसरात मुक्कामानंतर 28 जानेवारी रोजी तीसगाव (ता. औरंगाबाद) मार्गे नाशिककडे रवाना.

लॉंग मार्चची मागणी:
1. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा.
2. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

डाव्या व आंबेडकरी संघटनांच्या या एकजुटीमुळे नागरिकांनी 27 जानेवारी रोजी क्रांती चौकात येऊन लॉंग मार्चला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात