महाराष्ट्र ताज्या बातम्या

पेण अर्बन बँक घोटाळा – जप्त मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत देणार – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील ५९७ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना पैसे परत करण्यात येतील, अशी घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

भाजप आमदार पराग शाह यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला असता, भाजपचे सदस्य प्रशांत ठाकूर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. उत्तर देताना सहकारमंत्री पाटील म्हणाले, या प्रकरणात अनेक चौकशा झाल्या असून, दोषी संचालकांच्या ९७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप बँकेचा परवाना रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

या बँकेचे ५८,२०४ खातेदार असून, त्यांच्या एकूण ८६ कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेण अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळत नाहीत.

बँक अवसायनात काढण्याच्या प्रस्तावावर मतभेद असल्याने अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. काही लोकांचा त्यास विरोध असून, काही जणांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात