महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील नद्यांचे प्रदूषण गंभीर; प्रदूषणमुक्तीसाठी टास्क फोर्स आवश्यक – पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे

मुंबई – राज्यातील नद्यांचे प्रदूषण हा गंभीर प्रश्न असून, त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत व्यक्त केले. नदी ही केवळ महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायतींच्या अखत्यारीत नसून ती संपूर्ण राज्याची मालमत्ता मानली पाहिजे, असे स्पष्ट करत नदी प्रदूषण रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे धोरण आखण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बापूसाहेब पठारे आणि इतर सदस्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधून मुळा-मुठा नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न उपस्थित केला. या प्रदूषणामुळे शेती नापिक होत असून पर्यावरणीय संकट निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. महापालिकांनी नियुक्त केलेले ठेकेदार रात्रीच्या वेळी प्रदूषित पाणी नदीत सोडतात, अशांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली.

सदस्यांनी इंद्रायणी आणि गोदावरी नद्यांमधील प्रदूषणावरही चिंता व्यक्त केली. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीत कारखान्यांचे रासायनिक पाणी मिसळले जात असून, त्यामुळे भाविकांना त्रास होत असल्याची गंभीर बाब अधोरेखित करण्यात आली.

नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी धोरण तयार करणार – पर्यावरणमंत्री
यावर उत्तर देताना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “राज्यातील नदी प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात मार्गदर्शन करावे. सध्या वापरण्यात येणारे तंत्रज्ञान जुने असून, त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.”

नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सहा संबंधित विभागांचा समावेश असलेला टास्क फोर्स निर्माण करून व्यापक धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात