ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई

पुण्यातील मोतीबागेत प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांच्या भेटीची चर्चा सुरू असताना इंडिया आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याशिवाय काँग्रेस या प्रवेशाबाबत फारशी सकारात्मक नाही, असंच दिसून येतंय. त्यामुळे वंचितचा इंडिया आघाडीत कधी समावेश होणार, या चर्चांना अद्याप तरी पूर्णविराम मिळू शकलेला नाही.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

  • सध्यातरी इंडिया आघाडीची दारं आमच्यासाठी बंद आहे. आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचंय. येथे इंडिया आघाडीच्या सहमतीचा प्रश्न आहे.
  • इंडिया आघाडीत घेण्यास कोणाचा विरोध माहीत नाही.
  • इंडिया आघाडीत आल्यानंतर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाला कसं पोकळ केलंय याच आराखडा मांडू.
  • शरद पवारांसोबत भेटी होतच राहतील.

नेमकी अडचण कुठे?
शरद पवारांनी याआधीच प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत सकारात्मकदा दर्शवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट याबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येतं. मात्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून प्रकाश आंबेडकरांवर टीका होत असल्याचं दिसत आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात