महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक; देशातील 40 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रातच

मुंबई: 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. राज्यात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची परकीय थेट गुंतवणूक (FDI) आली असून, ही देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के इतकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक 32 टक्क्यांनी वाढलेली आहे. ही आकडेवारी 2024-25 या वर्षाच्या अंतिम तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) असून ती केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमी यशाबद्दल राज्यातील जनतेचे अभिनंदन करताना सांगितले की, “या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केली आहे. विशेष म्हणजे, फक्त पहिल्या 9 महिन्यांतच आपण जुने विक्रम मोडून काढले होते.”

राज्याच्या या यशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

ताज्या आकडेवारीनुसार:
• देशात 2024-25 मध्ये एकूण परकीय गुंतवणूक: 4,21,929 कोटी रुपये
• त्यापैकी महाराष्ट्रातील गुंतवणूक: 1,64,875 कोटी रुपये
• शेवटच्या तिमाहीतील गुंतवणूक (जानेवारी ते मार्च 2025): 25,441 कोटी रुपये

मागील वर्षांतील परकीय गुंतवणुकीची आकडेवारी (कोटी रुपयांमध्ये):
• 2015-16: 61,482
• 2016-17: 1,31,980
• 2017-18: 86,244
• 2018-19: 57,139
• एप्रिल-ऑक्टोबर 2019: 25,316
• 2020-21: 1,19,734
• 2021-22: 1,14,964
• 2022-23: 1,18,422
• 2023-24: 1,25,101
• 2024-25: 1,64,875 (रिकॉर्डब्रेक)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, “ही गुंतवणूक महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीला चालना देईल आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा उचलेल.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात