महाराष्ट्र ताज्या बातम्या

चेकने लाच स्वीकारणारे अमोल कीर्तिकर मविआचे उमेदवार कसे? संजय निरुपम यांचा खडा सवाल

X: @therajkaran

मुंबई: उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी जाहीर केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला आहे.

खिचडी घोटाळ्यात चेकने लाच स्वीकारणारा भ्रष्टाचारी अमोल कीर्तिकर महाविकास आघाडीचे (मविआ) उमेदवार कसे, उरल्या सुरल्या सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, अशी संतप्त भूमिका ज्येष्ठ नेते निरुपम यांनी सोशल मीडियावर मांडली आहे.

अंधेरी येथील एका कार्यक्रमात काल उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित केली. मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून अंतिम झाला नसताना शिल्लक सेनेच्या प्रमुखांनी कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित करून आघाडीचा धर्म मोडला आहे, असा घणाघात निरूपम यांनी केला. कोरोनाच्या काळात गरीब मोलमजुरांना दोनवेळच्या जेवणाची मारामार होती. त्यावेळी या सर्वांना उपासमारीची धग लागू नये म्हणून खिचडी पुरवण्याचे पाऊल मुंबई महापालिका प्रशासनाने उचलले होते. खिचडी पुरवठा करण्यासाठी ज्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती, त्याच्याकडून अमोल कीर्तिकर यांनी लाच घेतली होती आणि ही लाचेची रक्कम चक्क चेकच्या स्वरूपात घेण्यात आली, असा आरोप कीर्तिकर यांच्यावर आहे. तब्बल ५२ लाख रुपये कीर्तिकर यांच्या खात्यात जमा झाले असल्याचे समोर आले होते. मात्र ही रक्कम आपणास पगार म्हणून देण्यात आली असल्याची सारवासारव कीर्तिकर यांनी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या चौकशीत केली. गरीब मजुरांच्या पोटावरच लाथ मारून त्यांच्या ताटातील खिचडीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप असणाऱ्या लाचखोर कीर्तिकर यांना उमेदवारी दिली तर मविआचा पराभव निश्चित होईल, असा पवित्रा निरुपम यांनी घेतला आहे.

मुळातच अंतिम जागावाटप ठरले नसताना ठाकरे यांनी उमेदवारी का जाहीर केली, महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये जाणूनबुजून काँग्रेसचा अपमान केला जात असून काँग्रेस श्रेष्ठींनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशीही मागणी संजय निरुपम यांनी केली.

Also Read: Kolhapur Lok Sabha : कोल्हापूरमध्ये काटे की टक्कर : शाहू महाराजांविरोधात समरजितसिंह घाटगे रिंगणात

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात