ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राऊतांनी शिंदेंचा नवा फोटो केला ट्विट, असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच म्हणत पुन्हा जोरदार टीका

मुंबई

संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या गोळीबारामागे राज्यातील गुंडाराज कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

संजय राऊतांनी आज चौथा फोटो शेअर केला आहे, ज्यात मुख्यमंत्री एका गुंडासोबत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, गृहमंत्री देवेंद्रजी, यालाच म्हणतात गुंडांनी
गुंडासाठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत. हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच! हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा, असं आवाहन त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.

गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी…
गोळीबाराच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, विनोद घोसाळकर आणि मॉरिस दोघेही एकत्र काम करीत असल्याचं एकत्र पोस्टर वरुन लक्षत येत आहे. बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्या योग्य वेळी जाहीर करण्यात येतील. ही घटना गंभीर आहे. अशा घटनांचं राजकारण करणं योग्य नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. बंदूकांच्या परवाना देण्यासंदर्भात काही खबरदारी घ्यायला हवी याचाही विचार सुरू आहे. यासंदर्भतील आदेश देण्यात आले आहेत. विरोधकांकडून मात्र याचं राजकारण केलं जात आहे. गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात, असंही ते यावेळी म्हणाले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात