ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘महाराष्ट्रावर प्रेम आहे म्हणून नाही…’; संजय राऊतांनी सांगितलं मोदींचं वारंवार राज्यात येण्याचं कारण

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात आज दुसऱ्यांदा महाराष्ट्रात आले आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी नाशिक येथे युवा महोत्सव आणि अटल सेतूचं लोकर्पण केलं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान सोलापूर येथे आले आहेत. सोलापूर गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय अमृत योजनेंतर्गत इतर दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचेही पंतप्रधान भूमिपूजन करणार आहेत.

दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. महाराष्ट्रावर प्रेम आहे म्हणून पंतप्रधान वारंवार राज्यात येत नाही, दुसरं उत्तर प्रदेशावर त्यांचं जास्त प्रेम म्हणून ते वारंवार उत्तर प्रदेशात जात नाहीत, तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचा दौरा प्लान आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधित जागा असून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र निर्णायक भूमिका बजावेल. येथील सरकार अपयशी आहे. त्यांना कोणी मतदान करणार नाही. त्यामुळे मोदींना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतंय. गेल्या १३ महिन्यात ८ ते १० मोदींनी महाराष्ट्राचा दौरा केला आहे. खरंच हिंमत असेल तर त्यांनी मणिपूरला जाऊन दाखवावं, अशा शब्दात राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात